मध्य रेल्वेने सुरू केले 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'

मुंबई : कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नवनव्या संकल्पना (इनोव्हेटिव्ह आयडियाज) अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ स्थापित केले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे कोच वापरून बनवण्यात आले आहे, जे या भागातील खाद्यालय बनेल. रूळांवर ठेवलेले 'रेस्टॉरंट कोच' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोर आहे. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह विविध रेल्वे कलाकृती आहेत.


'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' एक उत्तम जेवणाचे ठिकाण असेल जे जेवणाऱ्यांना एक अनोखा अनुभव देईल. कोचमध्ये १० टेबलसह ४० व्यक्ती राहतील. रेस्टॉरंटचे आतील भाग अशा प्रकारे सजवले गेले आहे की प्रवासी तसेच लोकांना, रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेऊ शकतील.


या प्रसंगी श्री बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मनोज शर्मा, मुख्य प्रशासनिक अधिकारी (बांधकाम), गोपाल चंद्रा, प्रिन्सिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, मणि जीत सिंह, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, एस. के. पंकज, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, आलोक सिंह, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, ए. के. श्रीवास्तव, प्रिंसिपल चीफ सिग्नल व टेलिकम्यूनिकेशन्स इंजिनियर, आर. एल. राणा, प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून