सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळाचे बॉक्स

Share

पनवेल (वार्ताहर) : भारत विकास परिषद, पनवेल, हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले ५ हजार बॉक्स सैनिकांना पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत २ हजार बॉक्स तयार झाले आहेत. यासाठी भारत विकास परिषदेचे सदस्य मेहनत घेत आहेत. गतवर्षी सैनिकांना १४ हजार लाडू पाठविण्यात आले होते.

संस्थेचे हे दुसरे वर्ष असून सैनिकांना दिवाळीसाठी फराळ पाठवण्याचे शिवधनुष्य भारत विकास परिषदने यशस्वीरित्या पेलले आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सुबोध भिडे यांनी सांगितले. जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर, भुज, लेह येथील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. आपल्या जीवाची तमा न बाळगता सैनिक सीमेवर लढत असतात. आपण सारेजण दिवाळीत पदार्थ खातो, मात्र सीमेवर जवान आपले रक्षण करतात. आपले सैनिक घरापासून लांब असतात, त्यांना दिवाळीत घरातील कुटुंबीयांनी पाठवलेला दिवाळी फराळ खाता यावा, यासाठी त्यांना घरगुती बनवलेले पदार्थ पाठवणार आहेत. हा सारे दिवाळी फराळ दिवाळीच्या आधी सैनिकापर्यंत पोहोचवणार असल्याचे ज्योती कानिटकर यानी सांगितले.

भारत विकास परिषद पनवेल शाखेत एकूण १२८ सदस्य आहेत. लोकसहभागातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. मागील वर्षी ३७१ नागरिकांनी देणगी दिली होती. आतापर्यंत २७५ जणांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे.

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

51 minutes ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

3 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

3 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

3 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

3 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 hours ago