सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळाचे बॉक्स

पनवेल (वार्ताहर) : भारत विकास परिषद, पनवेल, हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले ५ हजार बॉक्स सैनिकांना पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत २ हजार बॉक्स तयार झाले आहेत. यासाठी भारत विकास परिषदेचे सदस्य मेहनत घेत आहेत. गतवर्षी सैनिकांना १४ हजार लाडू पाठविण्यात आले होते.


संस्थेचे हे दुसरे वर्ष असून सैनिकांना दिवाळीसाठी फराळ पाठवण्याचे शिवधनुष्य भारत विकास परिषदने यशस्वीरित्या पेलले आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सुबोध भिडे यांनी सांगितले. जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर, भुज, लेह येथील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. आपल्या जीवाची तमा न बाळगता सैनिक सीमेवर लढत असतात. आपण सारेजण दिवाळीत पदार्थ खातो, मात्र सीमेवर जवान आपले रक्षण करतात. आपले सैनिक घरापासून लांब असतात, त्यांना दिवाळीत घरातील कुटुंबीयांनी पाठवलेला दिवाळी फराळ खाता यावा, यासाठी त्यांना घरगुती बनवलेले पदार्थ पाठवणार आहेत. हा सारे दिवाळी फराळ दिवाळीच्या आधी सैनिकापर्यंत पोहोचवणार असल्याचे ज्योती कानिटकर यानी सांगितले.


भारत विकास परिषद पनवेल शाखेत एकूण १२८ सदस्य आहेत. लोकसहभागातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. मागील वर्षी ३७१ नागरिकांनी देणगी दिली होती. आतापर्यंत २७५ जणांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व