वाकण-पाली-खोपोली महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

गौसखान पठाण


सुधागड-पाली : वाकड-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक ५४८ (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. सद्य स्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळा आला की मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा जमा होतो. नंतर ऊन पडले की धुरळा उडतो, अशी दुहेरी समस्या येथे सतावत आहे. प्रवासादरम्यान मान, मणका, कमरेची हाडे सर्वकाही खिळखिळे होतात. तर वाहनेही बिघडून वाहनधारकांना न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. पाली ते रासळ हा तीन किमीचा मार्गाची सध्या खूप दुरवस्था झाली आहे.


मार्गावरील मोठ्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे. या राज्य मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊन पासून हे काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहन चालक, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास १९८ कोटी रु. खर्च करून राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे. या राज्य मार्गाचे काम पूर्वी मोनिका कन्ट्रक्शनकडे होते. मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने एमएसआरडीसीने बीसीसी कन्ट्रक्शनकडे दिले होते.


तरीही सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हे काम वरह इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र अजूनही कामाला पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे आजही संथ गतीने काम सुरू आहे वाहनचालक, प्रवासी यांची आजही प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोय होत असून एमएसआरडीसी यांच्या कारभाराबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


वाकण-पाली-खोपोली महामार्गाच्या संथ व अर्धवट कामामुळे तसेच योग्य नियोजनाचा अभाव यामुळे या मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष एमएसआरडीसीच्या विरोधात जन आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे , रायगड जिल्हा सरचिटणीस,ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी