वाकण-पाली-खोपोली महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

गौसखान पठाण


सुधागड-पाली : वाकड-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक ५४८ (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. सद्य स्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळा आला की मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा जमा होतो. नंतर ऊन पडले की धुरळा उडतो, अशी दुहेरी समस्या येथे सतावत आहे. प्रवासादरम्यान मान, मणका, कमरेची हाडे सर्वकाही खिळखिळे होतात. तर वाहनेही बिघडून वाहनधारकांना न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. पाली ते रासळ हा तीन किमीचा मार्गाची सध्या खूप दुरवस्था झाली आहे.


मार्गावरील मोठ्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे. या राज्य मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊन पासून हे काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहन चालक, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास १९८ कोटी रु. खर्च करून राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे. या राज्य मार्गाचे काम पूर्वी मोनिका कन्ट्रक्शनकडे होते. मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने एमएसआरडीसीने बीसीसी कन्ट्रक्शनकडे दिले होते.


तरीही सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हे काम वरह इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र अजूनही कामाला पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे आजही संथ गतीने काम सुरू आहे वाहनचालक, प्रवासी यांची आजही प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोय होत असून एमएसआरडीसी यांच्या कारभाराबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


वाकण-पाली-खोपोली महामार्गाच्या संथ व अर्धवट कामामुळे तसेच योग्य नियोजनाचा अभाव यामुळे या मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष एमएसआरडीसीच्या विरोधात जन आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे , रायगड जिल्हा सरचिटणीस,ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात