धोनीसाठी चेन्नई पुन्हा आग्रही

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुढील हंगामातही संघात कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझी उत्सुक आहे.


पुढील आयपीएल लिलावात धोनीसाठी पहिले रिटेन्शन कार्ड वापरले जाईल. पुढील वर्षीच्या हंगामासाठी एक मोठा लिलाव होणार आहे आणि दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे, असे सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्याच्या मते, फ्रँचायझी प्रथम एमएस धोनीला कायम ठेवेल आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. लिलावापूर्वी रिटेन्शन नक्कीच होईल, हे खरे आहे. किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल, याबद्दल आम्हाला माहिती नाही. तथापि, धोनी हा पहिला खेळाडू असेल जो आम्ही कायम ठेवू. या जहाजाला त्याच्या कॅप्टनची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी जे चांगले आहे ते आम्ही करू, असे त्याने म्हटले.


चेन्नईने कोलकाताला हरवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे २०१०, २०११, २०१८ आणि २०२१मध्ये ही चारही जेतेपदेे धोनीच्या नेतृत्वाखालील आहेत.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय