लसीकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद


ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील नागरिकांचे लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरिंग शिवसेनेने सुरू केले आहे का? महाराष्ट्र सरकारमार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.


कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचे आवाहन करणारे पोस्टर फाडले आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो होते. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे पोस्टर पहाटे तीनच्या सुमारास फाडण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



तर आमची जबाबदारी नाही- डॉ. आव्हाडांचे ट्विट


पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली, तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.


https://twitter.com/Awhadspeaks/status/1449251567215861761
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत