युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करा

पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पाऊस ओसरला असून यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची पार दुर्दशा झाली झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये पालघर, बोईसर, वसई, विरार, नालासोपारा, सफाळे, डहाणू व जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आणणे व विसर्जनास घेऊन जाणे या खड्ड्यांमुळे अत्यंत जिकीरीचे झाले होते. त्यावेळी तात्पुरती डागडुजी करणे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रॅबिट टाकणे अशा महत्त्वाच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागला.


दुसरीकडे, रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन तरुणांचे बळी गेले आहेत. वसई तालुक्यातील कामण-भिवंडी, शिरसाड-अंबाडी या रस्त्यावर अगणित अपघात झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आता पाऊस ओसरल्यामुळे संबधित विभागाने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली पाहिजेत, अशी मागणी करण्यात येत आहे.


शहरातील रस्त्यांची पार दुर्दशा झाली असून आम्ही जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहोत. रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून रिक्षा चालवण्याचे धाडस होत नाही. - अनंत पाटील, रिक्षाचालक, विरार पूर्व


जिल्ह्यात सर्वत्र रस्ते उखडले आहेत. अतिवृष्टीमध्ये रस्त्याची साईडपट्टी उखडली गेली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत अनेक अपघात घडले. सफाळे ते वरई फाटा हा मुख्य रस्ता त्वरित दुरुस्त होणे गरजेचे आहे. - सुंदरराज शेळके सफाळे, पालघर


शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यांना दिसत नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे करदात्यांना सध्या हालअपेष्टाना तोंड द्यावे लागत आहे. - शाम देसाई, दुचाकीस्वार, नालासोपारा


आम्हाला खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना खूप त्रास होतो. वाहने अक्षरशः हेलकावे खातात. खड्ड्यात ती उलटून पादचाऱ्यांच्या अंगावर पडतात की काय, अशी सतत भीती वाटते. त्यामुळे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. - सुनीला नायक, चार्टर्ड अकाउंटंट, माणिकपूर

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :