बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच

  159

घन:श्याम कडू


उरण : नवी मुबंई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश नवी मुबंई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिले असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे आज घडलेल्या अपघातावरून उघड होत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पहाणी करूनही उरण-पनवेल परिसरातील वाहतूककोंडी कमी होताना दिसत नाही.



उरणला अनधिकृत कंटेनर यार्डचा विळखा


आज गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरील वैश्वी गावाजवळ भरधाव ट्रेलरने इको गाडीला धडक दिली. सुदैवाने या गाडीतील ८ जण जखमी होऊन त्यांचा जीव वाचला आहे. यावरून उरणमधील अपघाताची मालिका सुरूच असल्याचे उघड होते. उरण परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून यावर उपाययोजना केली होती. तसेच, नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी आदेश काढून अवजड वाहनांस सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घातली होती. या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र, आज वैश्वी गावाजवळ झालेल्या अपघातामुळे अवजड वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे.


उरण परिसरात अनेक कंटेनर यार्ड उभे राहिले आहेत. त्यामधील अनेक कंटेनर यार्ड अनधिकृत आहेत. त्यांच्या सेवेसाठी शासकीय प्रशासन यंत्रणा राबत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. सदर कंटेनर यार्डमधील वाहनांना ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर रस्त्यावर वाट करून देणे व भर रस्त्यावर ट्रेलर उभे करणे यामुळेच वाहतूककोंडी व वारंवार अपघात घडत आहेत. अपघातामध्ये अनेक तरुणांचा जीव गेला आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारीवर्गाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे.



...अन्यथा असेच अपघात होत राहणार


अपघाताची मालिका रोखण्यासाठी अवजड वाहतुकीस बंदी असलेल्या आदेशाचे पालन करणे व परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांना अशा घडणाऱ्या अपघातांचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने