बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच

  154

घन:श्याम कडू


उरण : नवी मुबंई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश नवी मुबंई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिले असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे आज घडलेल्या अपघातावरून उघड होत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पहाणी करूनही उरण-पनवेल परिसरातील वाहतूककोंडी कमी होताना दिसत नाही.



उरणला अनधिकृत कंटेनर यार्डचा विळखा


आज गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरील वैश्वी गावाजवळ भरधाव ट्रेलरने इको गाडीला धडक दिली. सुदैवाने या गाडीतील ८ जण जखमी होऊन त्यांचा जीव वाचला आहे. यावरून उरणमधील अपघाताची मालिका सुरूच असल्याचे उघड होते. उरण परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून यावर उपाययोजना केली होती. तसेच, नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी आदेश काढून अवजड वाहनांस सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घातली होती. या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र, आज वैश्वी गावाजवळ झालेल्या अपघातामुळे अवजड वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे.


उरण परिसरात अनेक कंटेनर यार्ड उभे राहिले आहेत. त्यामधील अनेक कंटेनर यार्ड अनधिकृत आहेत. त्यांच्या सेवेसाठी शासकीय प्रशासन यंत्रणा राबत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. सदर कंटेनर यार्डमधील वाहनांना ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर रस्त्यावर वाट करून देणे व भर रस्त्यावर ट्रेलर उभे करणे यामुळेच वाहतूककोंडी व वारंवार अपघात घडत आहेत. अपघातामध्ये अनेक तरुणांचा जीव गेला आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारीवर्गाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे.



...अन्यथा असेच अपघात होत राहणार


अपघाताची मालिका रोखण्यासाठी अवजड वाहतुकीस बंदी असलेल्या आदेशाचे पालन करणे व परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांना अशा घडणाऱ्या अपघातांचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी