शाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शहरी भागातील काही शाळांना काही वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळेची घंटा अकरा दिवसांपूर्वी वाजली, तरीही ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलवरच येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.


शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिकवणीचा प्रश्न दूर होईल, अशी समजूत पालक वर्गाची होती; परंतु ऑनलाइन शिकवणी बंद केली असली तरी शिक्षक वर्ग विविध अध्ययनाच्या लिंक मोबाईलवर पाठवून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने आरोग्यावरही परिणाम होत आहे.


मोबाईल, संगणक व लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोगाचे परिणाम समोर आले आहेतच. तसेच हेडफोनच्या वापरामुळे कानांचे आजारही समोर आले होते. तसेच मुलांना स्थूलपणाच्या समस्येनेही घेरले होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना मोबाईल खरेदीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला होता. या सर्व समस्या सर्वश्रुत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा जर विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास प्रवृत्त करत असतील, तर असे करू नये. सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. - जयदीप पवार,उपायुक्त, शिक्षण, मनपा

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास