दसऱ्याचा शिमगा करून टाकला : चंद्रकांत पाटील



मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याचा शिमगा केला. केंद्राच्या आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.


उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर टीका केली. त्याला चंद्रकांच पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्राच्या नावाने शिमगा करून काय उपयोग? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय, असे सवाल त्यांनी केले. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, राज्यात ड्रग्ज, गांजाचे प्रकार वाढले, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, हे चिंताजनक आहे. यासाठी इतिहास वाचावा लागतो, स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कोठे होता? तुमचा जन्म झाला नव्हता. पण स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कुठे होती? स्वातंत्र्यलढा तीव्र झाल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघ स्थगित ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संघाची सुरुवात केली. हा इतिहास आपल्याला माहीत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.


आणीबाणीमध्ये अनेक पत्रकार, संघाचे लाखो कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते, तुम्ही काय केले होतं? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. आजच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. लष्करी संग्रहालयाबद्दल बोलले, पण दोन वर्षांत शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाल, असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या

जिल्हा नियोजन निधी भूगोलावर ठरवू नका, त्या-त्या जिल्ह्याच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घ्या! - आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडले

लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी, तर मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटींचा निधी द्या मुंबई : "जिल्हा नियोजन निधी केवळ

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र