दसऱ्याचा शिमगा करून टाकला : चंद्रकांत पाटील

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याचा शिमगा केला. केंद्राच्या आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर टीका केली. त्याला चंद्रकांच पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्राच्या नावाने शिमगा करून काय उपयोग? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय, असे सवाल त्यांनी केले. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, राज्यात ड्रग्ज, गांजाचे प्रकार वाढले, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, हे चिंताजनक आहे. यासाठी इतिहास वाचावा लागतो, स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कोठे होता? तुमचा जन्म झाला नव्हता. पण स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कुठे होती? स्वातंत्र्यलढा तीव्र झाल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघ स्थगित ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संघाची सुरुवात केली. हा इतिहास आपल्याला माहीत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.

आणीबाणीमध्ये अनेक पत्रकार, संघाचे लाखो कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते, तुम्ही काय केले होतं? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. आजच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. लष्करी संग्रहालयाबद्दल बोलले, पण दोन वर्षांत शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाल, असा सवाल त्यांनी केला.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

26 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

27 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

38 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

46 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

49 minutes ago