भूजलसाठा वाढवण्यासाठी भाजपच्या सूचना

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांमुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरत नाही. यावर पर्याय म्हणून पर्जन्यजलवाहिन्यांच्या प्रत्येकी १०० फूट अंतरावर पाझरखड्डे बनविण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या पाझरखड्ड्यांमुळे पावसाचे पाणी समुद्रात न जाता ते जमिनीतच मुरून भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी सूचना माजी उपमहापौर व भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी आयुक्तांना केली आहे.

मुंबईतही विकासकामे झपाट्याने होत आहेत. रस्ते, पदपथ, शासकीय, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी अशा बहुतांश ठिकाणी काँक्रिटीकरण झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे दरवर्षी २ हजार मिलीमिटर पेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडूनही त्यातून जमिनीवर पडणारे पाणी जमिनीत न मुरता ते वाहत समुद्रात जाऊन मिळते. पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने जमिनीतील जलसाठ्याची पातळी खालावत चालली आहे.

हे सुद्धा वाचा मुंबईतील नष्ट झालेल्या ८४ विहिरींची नोंद कुठे?

महत्वाचे म्हणजे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे हे कार्यरत असतानाच मुंबईत नव्याने निर्माण होणाऱ्या सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र असे असतानाही त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही. परिणामी, भूजलसाठ्यात देखील पाण्याची वाढ होताना दिसत नसल्याने त्याचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत असल्याचे देखील अलका केरकर यांनी म्हटले आहे. यामुळेच मुंबई महापालिकेने तिच्या हद्दीतील प्रत्येक १०० फुटांच्या अंतरावर पाझरखड्डे निर्माण करावेत. यामुळे पाणी जमिनीत मुरेल व जमिनीतील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात चांगली वाढ होईल. त्याचबरोबर मुंबईत उद्भवणाऱ्या पूरपरस्थितीलाही काही प्रमाणात आळा बसेल, असे नगरसेविका केरकर यांनी म्हटले आहे.

Recent Posts

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

5 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

5 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

6 hours ago

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

9 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

9 hours ago

Hathras stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२२ लोकांचा मृत्यू

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…

9 hours ago