न्यायासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे जाणार हायकोर्टात

  103

मुंबई (प्रतिनिधी) : लघुवाद न्यायालयाने मुलुंड भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करतानाच या निर्णयाच्या अंमलबजावणीस चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. तर, निवडणूक अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगत प्रभाकर शिंदे आता या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


मुंबई महानगरपलिकेच्या २०१७च्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर छाननी अधिकाऱ्यांकडून उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी झाली नाही. या एका कारणास्तव प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. मात्र याबाबत शिंदे म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे किंवा कसे हे तपासण्याचा कुठलाही अधिकार उमेदवारास नसतो. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निर्णय जाहीर करून राजपत्रात निवडणूक निकाल जाहीर करणे, ही राज्य निवडणूक आयोगाची व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यात कुठलाही हस्तक्षेप उमेदवार करू शकत नाही. इतकेच नाही तर, निवडणूक जिंकल्यानंतर शिंदे यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे, असे असताना आता राजकीय आकसापोटी त्रयस्थ व्यक्तीने यासंदर्भात याचिका केली होती. असे देखील शिंदे म्हणाले आहेत. तर निवडणुकीच्या साडेचार वर्षांनंतर प्रभाकर शिंदे यांच्यावर असा अन्याय करणे, योग्य ठरणार नसल्याचं विधिज्ञांचेही मत आहे.


लघुवाद न्यायालयाच्या प्रभाग क्रमांक १०६ मुलुंड येथील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या आणि त्या अनुषंगाने प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णयाच्या अंमलबजावणीस लघुवाद न्यायालयाने ४ आठवड्यांची स्थगिती दिलेली आहे. याबाबत प्रभाकर शिंदे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.