राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वरच्या खेळाडूंचे यश

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ खेळाडूंनी पंधरा पदके महाराष्ट्राला जिंकून दिली.


कोरोनानंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १३ खेळाडूंची निवड झाली. त्यातील आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवड्याभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली. तनश्री जाधव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक  आणि वैयक्तिक विजेतेपदामध्ये देखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक अशी एकूण चार पदके पटकावली.


रिषभ घुबडे याने १८ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कांस्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कांस्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली. सोहम शिवगण याने १४ वर्षांखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कांस्यपदक तसेच सांघिक कांस्य पदक पटकावले. आदी वायंगणकर याने १४ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कांस्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्ये देखील कांस्य पदक पटकावले. तसेच अक्षय तरळ याने खुल्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. १२ वर्षांखालील गटात सानवी देसाई आणि शिवांगी पै यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक  जिंकले.


या सर्व निकालाच्या मागे श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मार्गदर्शक महेश अटाळे तसेच गणेश देवरुखकर, इशा देवरुखकर आणि अविनाश मोरे अशी प्रशिक्षकांची टीम होती.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध