राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वरच्या खेळाडूंचे यश

  75

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ खेळाडूंनी पंधरा पदके महाराष्ट्राला जिंकून दिली.


कोरोनानंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १३ खेळाडूंची निवड झाली. त्यातील आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवड्याभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली. तनश्री जाधव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक  आणि वैयक्तिक विजेतेपदामध्ये देखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक अशी एकूण चार पदके पटकावली.


रिषभ घुबडे याने १८ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कांस्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कांस्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली. सोहम शिवगण याने १४ वर्षांखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कांस्यपदक तसेच सांघिक कांस्य पदक पटकावले. आदी वायंगणकर याने १४ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कांस्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्ये देखील कांस्य पदक पटकावले. तसेच अक्षय तरळ याने खुल्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. १२ वर्षांखालील गटात सानवी देसाई आणि शिवांगी पै यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक  जिंकले.


या सर्व निकालाच्या मागे श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मार्गदर्शक महेश अटाळे तसेच गणेश देवरुखकर, इशा देवरुखकर आणि अविनाश मोरे अशी प्रशिक्षकांची टीम होती.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला