पाषाणे ग्रा.पं.मधील शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

  48

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतमधील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पनवेल येथे त्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला असून आमदार आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.


पाषाणे ग्रुपग्रामपंचायतमधील पाषाणे, माले, आसे या गावांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार आणि भाजप जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवक कार्यकर्ते किरण ठाकरे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील आणि युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राहुल बदे आदी उपस्थित होते.


पाषाणे ग्रामपंचायतमधील सदस्य रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी वेहेले, दशरथ वेहेले, निलेश ऐनकर, नरेश धुळे, जगदीश धुळे, किरण नाईक, रोशन पाटील, समीर निचिंदे, सतीश जोशी, गणेश दिघे, सतीश दिघे, हेमंत निचिंदे, राम जोशी, सुनील दळवी, अविनाश जोशी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी