पाषाणे ग्रा.पं.मधील शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतमधील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पनवेल येथे त्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला असून आमदार आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.


पाषाणे ग्रुपग्रामपंचायतमधील पाषाणे, माले, आसे या गावांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार आणि भाजप जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवक कार्यकर्ते किरण ठाकरे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील आणि युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राहुल बदे आदी उपस्थित होते.


पाषाणे ग्रामपंचायतमधील सदस्य रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी वेहेले, दशरथ वेहेले, निलेश ऐनकर, नरेश धुळे, जगदीश धुळे, किरण नाईक, रोशन पाटील, समीर निचिंदे, सतीश जोशी, गणेश दिघे, सतीश दिघे, हेमंत निचिंदे, राम जोशी, सुनील दळवी, अविनाश जोशी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी