भारतीय जवान पाकिस्तानला पाठवत होता गुप्त माहिती

जोधपूर : भारताच्या लष्करी जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम 'आयएसआय' या पाकिस्तानी एजन्सीच्या महिला करत आहेत. अशातच जोधपूर मिलिटरी इंजिनीअरींग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह हे या महिलेच्या जाळ्यात अडकले. आणि सीमेपलीकडील पाकिस्तानी महिलांना देशाच्या सुरक्षेची गोपनीय माहिती पाठवण्यास सुरुवात केली. याप्रकरणी राम सिंगला अटक झाली असून त्याची चौकशी होत आहे तसेच जयपुरमधील गुप्तचर संस्थांकडून पुढील चौकशी करण्यात येणार आहे.


सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर लक्ष ठेवून आहे. गेले तीन महिने राम सिंग व्हॉट्सऍपद्वारे देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती सीमेपलीकडील आयएसआय या पाकिस्तानी संस्थेला पाठवत होता.


प्राथमिक चौकशीत रामसिंगच्या फोनमधून देशहितासंबंधी अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाल्याचे समोर आले. तपासादरम्यान, त्याच्या फोनमध्ये सीमेपलीकडे पाठवलेली भारतीय लष्करांच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली. अद्याप गुप्तचर संस्थेकडून राम सिंगचा तपास सुरू असल्याचे सुत्रांनुसार कळले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च