घंटा वाजली; पण वर्ग काही भरले नाहीत

पालघर (प्रतिनिधी) : राज्यात शाळेची घंटा वाजली, पण अनेक पालकांना ती ऐकूच आली नाही. कारण शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे दिसून आले आहे. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कोरोनाच्या भितीमुळे शाळेत पाठवण्यास तयार नाहीत,असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.


पालघर जिल्ह्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ३० ते ३५ टक्के इतकीच आहे. योग्य त्या सुविधांचा अभाव, कोरोना विषयक खबरदारीचे उपाययोजना करण्याबाबत शाळा प्रशासनाची उदासीनता आणि पालकांची मानसिकता, अशा तीन कारणामुळे शाळेची घंटा वाजली. परंतु वर्ग भरले नाहीत, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. २५ ते ३० टक्के शिक्षकांना अद्याप दुसरी लस न मिळाल्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळत नाही. तर अनेक शिक्षक कोरोनाच्या भितीमुळे कामावर येऊ पाहत नाहीत. मंदिरांची घंटा वाजली व भक्ताची गर्दी उसळली, तसे शाळांच्या बाबतीत घडू शकले नाही.


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेला पाठ फिरवली. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. सद्यपरिस्थितीत शाळा सुरू करणे कठीण आहेच परंतु विद्यार्थ्यांसाठी ते धोकादायकही ठरू शकते, असे पालकांचे म्हणणे आहे.


पालघर जिल्ह्यात हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, या शाळांमधून सुमारे तीन ते चार लाख मुले शिकत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने शाळा बंद करून ऑनलाईन ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू केली. ऑनलाईन शिक्षण शहरी विद्यार्थ्यांना सोयीचे ठरले मात्र ग्रामीण भागात ही व्यवस्था कुचकामी ठरली.



Comments
Add Comment

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन