पालिकेच्या सभा प्रत्यक्ष घेण्यापासून सेनेचा पळ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सभा प्रत्यक्षपणे घ्या ही मागणी भाजप सातत्याने करत आहे, असे असताना सत्ताधारी शिवसेना मात्र प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.


मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवासाला ही मुभा दिल्यानंतर पालिकेतील सभा प्रत्यक्ष का नको म्हणून भाजपने सातत्याने सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली नाही. यापूर्वी देखील याच मागणीसाठी भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे आंदोलन केले होते. असे असताना देखील भाजप सदस्यांना बुधवारी बैठकीत बसू दिले नाही.


दरम्यान या मागणीसाठी भाजपने उच्च न्यायालयात देखील याचिका केली होती. यात सभा प्रत्यक्ष घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सत्ताधारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.


कोरोना काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यास सुरुवात झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करता येत नसून विरोधकांना ऐकू देखील येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठका घ्या ही मागणी भाजपने केली होती. तर स्थायी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.


पालिकेतील सभा प्रत्यक्ष घेतल्या जाव्यात, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी सरकारला तसे पत्र देखील लिहिले आहे. मात्र सरकारने तूर्त तरी पालिकेच्या सभा प्रत्यक्ष न घेता व्हिसीद्वारे घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसारच सभा घेण्यात येत आहे. - यशवंत जाधव, स्थायी समिती

Comments
Add Comment

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल