पालिकेच्या सभा प्रत्यक्ष घेण्यापासून सेनेचा पळ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सभा प्रत्यक्षपणे घ्या ही मागणी भाजप सातत्याने करत आहे, असे असताना सत्ताधारी शिवसेना मात्र प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.


मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवासाला ही मुभा दिल्यानंतर पालिकेतील सभा प्रत्यक्ष का नको म्हणून भाजपने सातत्याने सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली नाही. यापूर्वी देखील याच मागणीसाठी भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे आंदोलन केले होते. असे असताना देखील भाजप सदस्यांना बुधवारी बैठकीत बसू दिले नाही.


दरम्यान या मागणीसाठी भाजपने उच्च न्यायालयात देखील याचिका केली होती. यात सभा प्रत्यक्ष घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सत्ताधारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.


कोरोना काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यास सुरुवात झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करता येत नसून विरोधकांना ऐकू देखील येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठका घ्या ही मागणी भाजपने केली होती. तर स्थायी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.


पालिकेतील सभा प्रत्यक्ष घेतल्या जाव्यात, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी सरकारला तसे पत्र देखील लिहिले आहे. मात्र सरकारने तूर्त तरी पालिकेच्या सभा प्रत्यक्ष न घेता व्हिसीद्वारे घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसारच सभा घेण्यात येत आहे. - यशवंत जाधव, स्थायी समिती

Comments
Add Comment

सरकारी कर्मचारी आता झोहो ईमेल प्लॅटफॉर्मवर, १२ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे अकाउंट झोहोवर

मुंबई : पंतप्रधान कार्यालयासह केंद्र सरकारमधील सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांचे ई-मेल पत्ते आता राष्ट्रीय माहिती

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने