केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर


शरद पवार यांचा आरोप




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एनसीबी, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी अशा विविध केंद्रीय यत्रणांकडून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर होत असलेल्या कारवायांनी धास्तावलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाया राजकीय हेतूने केल्या जात असल्याचा आरोप केला.


केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी, या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही उदाहरणे सांगायची झाल्यास, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकारी बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तत्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरू झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते. अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच-पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला जातो, याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत लगावला. सत्तेचा गैरवापर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवरच होतो, असे नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करुनही पाडता आले नाही म्हणून नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.


केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अंमली पदार्थांची क्वाटिंटी अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अंमली पदार्थ जप्त केले. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

सरकारी कर्मचारी आता झोहो ईमेल प्लॅटफॉर्मवर, १२ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे अकाउंट झोहोवर

मुंबई : पंतप्रधान कार्यालयासह केंद्र सरकारमधील सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांचे ई-मेल पत्ते आता राष्ट्रीय माहिती

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने