मुंबई : कुर्ला पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळच्या नेहरूनगर परिसरातील धम्म सोसायटीत बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या १८ वॉटर टँकर आणि १६ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. आगीच्या झळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग लावण्यात आल्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…