कुर्ल्यातील आगीत २० दुचाकी जळून खाक

  71

मुंबई : कुर्ला पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळच्या नेहरूनगर परिसरातील धम्म सोसायटीत बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या १८ वॉटर टँकर आणि १६ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. आगीच्या झळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग लावण्यात आल्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे.


अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहे.


पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या