कापणीची वेळ अन् पावसाचा खेळ...







संजय नेवे


विक्रमगड : तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागांतील भातशेती कापणीसाठी तयार झाली असून भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवळे सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवण्याचे स्वप्न बळीराजाने बघितले होते. मात्र, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.


या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसांत थांबला नाही तर कापलेले भातपीक खराब होऊन वर्षभराची मेहनत पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भातपीक खाली पडल्याने भातपिकांची धूळधाण झाली आहे.वर्षभराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. - प्रमोद विश्वनाथ पाटील, शेतकरी, आपटी

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा