कापणीची वेळ अन् पावसाचा खेळ...







संजय नेवे


विक्रमगड : तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागांतील भातशेती कापणीसाठी तयार झाली असून भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवळे सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवण्याचे स्वप्न बळीराजाने बघितले होते. मात्र, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.


या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसांत थांबला नाही तर कापलेले भातपीक खराब होऊन वर्षभराची मेहनत पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भातपीक खाली पडल्याने भातपिकांची धूळधाण झाली आहे.वर्षभराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. - प्रमोद विश्वनाथ पाटील, शेतकरी, आपटी

Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला