बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरात घट

Share

मुंबई (प्रतिनिधी) : देशाचं सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून आपला रेपो लिंक्ड व्याजदर हा ६.९० वरून ६.८० टक्के म्हणजेच १० बेसिस पॉइंटने घट केली आहे. बँकेकडून गृहकर्ज, चारचाकी वाहन, शैक्षणिक, व्यक्तिगत कर्ज तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ह्या घटलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल.

त्याच प्रमाणे एमसीएलआरमध्ये सुद्धा १० बेसिस पॉइंटने घट करून तो ६.७० टक्के करण्यात आला आहे. एक दिवसासाठी तो ६.७० टक्के, एक महिना मुदतीसाठी ६.८० टक्के, ३ महिन्यांसाठी ७.१० टक्के आणि ६ महिने मुदतीसाठी ७.१५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे. एक वर्ष मुदतीसाठी सुद्धा एम सी एल आर ५ बेसिस पॉइंटने ७.२५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे.

तत्पूर्वी सणासुदीच्या कालावधितील आनंदात भर घालण्यासाठी बँकेने गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज यावरील प्रक्रिया शुल्क बँकेने माफ केले आहे. आता आरएलएलआर मध्ये घट केल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर हा ६.८० टक्के, चारचाकी वाहन कर्जाचा व्याजदर ७.०५ टक्के व सोने तारण कर्जाचा व्याजदर ७.०० टक्के झाला असून तो सर्वांना परवडेल असा व्याजदर आहे.

“आरएलएलआरमध्ये घट केल्यामुळे आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज घेणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना ती कर्जे घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व यावर्षीचा त्यांचा सणांचा आणि उत्सवांचा उत्साह द्विगुणीत होईल “ असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी व्यक्त केला.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

5 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

7 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

7 hours ago