मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण २००८ची (Malegaon Bomb Blast Case) सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) आरोपी क्रमांक १० सुधाकर धर द्विवेदी (Sudhakar Dwivedi) उर्फ दयानंद पांडे याच्या विरोधात १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी केले आहे. पुढील सुनावणीत हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने नुकतेच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
सुनावणीवेळी सुधाकर द्विवेदी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत १० हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.
मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्याऐवजी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने एनआयएला २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी देखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…
महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…
मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…
मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…
मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…
नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…