पुण्यासह, मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या सरी

Share

वाशिममध्ये वीज कोसळून एक ठार

नाशिक : राज्यातील कोकण वगळता इतर विभागातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे गुरूवारी आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पुणे, संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहताना पाहायला मिळाला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरही जोरदार पाउस कोसळला. नांदेड सिटी, धायरी, बावधन, कात्रजघाट हायवे मार्गावर पाऊस झाला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासूनच यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी,दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, नेर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचे तापमान हे ४२.५अंशांवर गेले असता अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला लागला असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र,अवकाळी पावसामुळे पालेभाज्या आणि फळबागांचे नुकसानही होत आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस चंद्रपुरात मुसळधार पाऊस अनुभवला जात आहे. गेला महिनाभर चंद्रपूरकर लाही-लाही करणारे ऊन अनुभवत होते. त्यावेळी, पारा ४४.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना गेले दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसाने चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील बिनबा गेट ते आंबेडकर पुतळा मार्गावर पाणी देखील जमा झाले होते.

Recent Posts

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

2 hours ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

3 hours ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

4 hours ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

5 hours ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

5 hours ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

6 hours ago