Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीमहापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश

महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश

शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका

मुंबई : मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्ड रचना नऊने वाढवून ती २२७ वरुन २३६ वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले होते. मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने हे वॉर्ड रद्द करण्यात आल्याची माहिती देत शिंदे सरकारने निर्णय घेतला होता. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ साली वॉर्ड संख्या ठरली होती त्या प्रमाणे कायम ठेवली होती. या निर्णयाला शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

हा निर्णय न्याय देणारा आहे. महिना दीड महिन्यापूर्वी ज्या नगरविकास मंत्र्यांनी वॉर्ड पुनर्रचनेच्या आदेशावर सही केली, तेच आजही नगरविकास मंत्री आहेत. मग या काळात असे काय बदलले, त्यांनीच नंतर विरोध केला. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -