जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला आणि दोन मुलांची गोळी झाडून हत्या(murder) करण्यात आली. शहराच्या झालाना परिसरात झालेल्या या हत्याकांडानंतर येथे मोठी खळबळ उडाली. हत्याच्या कारणांचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिहेरी हत्येची सूचना मिळताच मोठ्या संख्याने पोलीस दल तेथे पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना झालाना परिसरात बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाली. यात एका महिलेसह दोन मुलांना गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली.
ही हत्या कोणी केली आणि का करण्यात आली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून याबाबतचा तपास जोरात सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर एकच असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्लेखोर झालाना परिसरातील सी-टू प्लाझा स्थित एका घरात घुसला. हा हल्लेखोर घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आणि खोलीत बसलेली महिला तसेच दोन मुलांना गोळी मारून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोराने मृत महिलेच्या नणंदेला धक्का देत तेथून फरार झाला. काही समजण्याच्या आत आरोपी तेथून फरार झाला होता.
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोक घरातून बाहेर आले. या दरम्यान, घटना घडलेल्या परिसरातून रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने लोक तेथे पोहोचले. मात्र तेथे महिला आणि तिच्या दोन मलुांचा मृतदेह पडले होते. हे पाहून लोक चांगलेच भयभीत झाले आणि त्यांनी तात्काळ ही सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले.
दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध; साधक निर्दोष मुक्त! पुणे : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी…
संशोधकांच्या उंचावल्या भुवया; जाणून घ्या सविस्तर माहिती मेक्सिको : जगभरात विविध घडामोडी घडत असताना संशोधक…
व्हिडीओ होतोय व्हायरल; नेमकं प्रकरण काय? जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती पालघर : कणकवली, देवगड,…
दोन बाईकस्वार, दोन जोडपी, रिक्षावाला आणि मग शिक्षक; बाळाची सुटका करण्यासाठी पोलिसांचा थरार का केलं…
'या' दिवशी दहावी व बारावीचे निकाल होणार जाहीर पुणे : वाढत्या महागाईमुळे बोर्डाने दहावी बारावी…