जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार आणि मतदान (Voting) देखील सुरु आहे. राज्यात तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान, मतदानावेळी काही अनुचित प्रकारही घडले. काही ठिकाणी हाणामारी, तर काही ठिकाणी चक्क ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न झाला. काही ठिकाणी बोगस मतदानाचाही प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता जालन्यात (Jalana) मतदानापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात बेवारस मतदान पत्रे (Voting cards) चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल १७६ मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना काल सकाळी मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आली. याबाबत, त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांच्या नावांची बीएलओमार्फत तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मात्र, मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.
मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…