पुणे : वाढत्या महागाईमुळे बोर्डाने दहावी बारावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बातमी ज्वलंत असतानाच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी माहिती हाती लागली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Education) १०वी, १२वीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली. यानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागले असून बोर्डाने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली आहे. (SSC HSC Result 2024)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे निकाल मे महिन्यातच लागणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल येत्या २० मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.
विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…
सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…
प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…
मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…