मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रीया पूर्ण झाली असून मुंबई, ठाणेसारख्या भागातील डिजिटायझेशनचे प्रमाण ५० टक्केंच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर या प्रक्रीयेला मुदतवाढ देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. (SIR Campaign)
नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन व्यवहार आणि सार्वजनिक सुरक्षेवर त्याचे ...
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विनंतीची दखल घेत आयोगाने ही मुदतवाढ आणि नवीन वेळापत्रक मंजूर केले आहे. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (SIR Campaign)
सुधारित कार्यक्रमानुसार, १७ ऑगस्टपर्यंत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण करतील. त्याच दिवशी मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम पार पडेल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी जाहीर केली जाईल. या मसुदा यादीवर नागरिकांना, राजकीय पक्षांना आपले दावे आणि हरकती २३ सप्टेंबरपर्यंत नोंदवता येतील. (SIR Campaign)
मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश, महिलांसाठी ...
प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींची सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. यानंतर सर्व आवश्यक दुरुस्त्या, नव्या मतदारांची नोंदणी आणि दुबार अथवा मृत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (SIR Campaign)




