Jalgaon : मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत १७ जुलैपर्यंत तब्बल १९ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग तात्पुरते बदलण्याची घोषणा केली आहे. या गाड्या आता मनमाड–जळगाव–पाळधी–सुरत या पर्यायी मार्गावरून धावणार आहेत.
भूस्खलनामुळे रेल्वे रुळांचे नुकसान
लोणावळा–कर्जत मार्गावरील भूस्खलनामुळे रेल्वेच्या अनेक रुळांचे नुकसान झाले आहे. सध्या या मार्गावर केवळ एका रेल्वे मार्गावरूनच वाहतूक सुरू असून उर्वरित मार्गांवरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र नुकसानाचे प्रमाण मोठे असल्याने पूर्णपणे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आपण आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना नेहमी सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट आणि धडपड करत असतो. मात्र काही वेळा ...
पर्यायी मार्ग कोणते ?
दौंड–मनमाड–जळगाव–पाळधी–सुरत मार्गावरून एकूण नऊ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०९१९ एमजीआर चेन्नई–एकतानगर एक्स्प्रेस (१० जुलै), १६६१४ कोईम्बतूर–राजकोट एक्स्प्रेस (१० जुलै), २२७१८ सिकंदराबाद–राजकोट एक्स्प्रेस (११, १३ व १४ जुलै), ०९४२० तिरुचिरापल्ली–अहमदाबाद एक्स्प्रेस (१२ जुलै), २०९५३ एमजीआर चेन्नई–अहमदाबाद एक्स्प्रेस (१२ जुलै), २२१९३ दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस (१२ जुलै), २२९१९ एमजीआर चेन्नई–अहमदाबाद एक्स्प्रेस (१५ जुलै), २०९६७ सिकंदराबाद–पोरबंदर एक्स्प्रेस (१५ जुलै) आणि ०९६२८ सोलापूर–अजमेर एक्स्प्रेस (१६ जुलै) यांचा समावेश आहे.
सुरत–पाळधी–मनमाड–दौंड–सोलापूर मार्गावरून एकूण सात गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०९५४ अहमदाबाद–एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस (११ जुलै), १६६१३ राजकोट–कोयंबतूर एक्स्प्रेस (१२ जुलै), २२९२० अहमदाबाद–एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस (१३ जुलै), २२७१७ राजकोट–सिकंदराबाद एक्स्प्रेस (१३, १५, १६ जुलै), २०९६८ पोरबंदर–सिकंदराबाद एक्स्प्रेस (१४ जुलै), २०९२० एकतानगर–एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस (१५ जुलै) आणि ०९४१९ अहमदाबाद–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस (१६ जुलै) या गाड्यांचा समावेश आहे.
Nashik : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीला वेग आला असतानाच धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ...
रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि मार्गातील बदल तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या तात्पुरत्या परिस्थितीत प्रवाशांनी संयम बाळगून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येत असला, तरी पूर्णपणे पूर्वस्थिती निर्माण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवस प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.






