शिर्डी : राम मंदिराच्या नावाने रान उठवणाऱ्यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक संस्थांतील कथित गैरव्यवहारांवर का बंद होते ? असा थेट सवाल करत राज्याचे मस्त्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी शिर्डीतून शिवसेना (उबाठा) गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. अभिनेता आमिर खान यांच्यावर "लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर" असल्याचा आरोप करत हिंदूंनी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा असे आवाहन त्यांनी केले. तर खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका करत राज्याच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी टाकली.
पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथील मोशी (Moshi) कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या भीषण दुर्घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. मागील चार दिवसांपासून ...
View this post on Instagram
दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी शनिवार दि. ११ रोजी मातोश्री निलमताई राणे (Nilamtai Rane) यांच्या समवेत श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या हस्ते साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक प्रहार चे मुख्य लेखाधीकारी ज्ञानेश सावंत, पोपट शिंदे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. साई दर्शनासाठी मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. आमिर खान यांच्या तिसऱ्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आमिर खान यांच्यावर "लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर" असल्याचा आरोप केला. हिंदू समाजातील तरुणांनी त्यांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवावी असे आवाहनही त्यांनी केले.
Jalgaon : मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य ...
View this post on Instagram
राम मंदिर दान प्रकरणावर आंदोलन करणाऱ्यांवर निशाणा साधताना ना.राणे म्हणाले की, राम मंदिराच्या नावाने आक्रोश करणारे मशिदींतील कथित गैरव्यवहार किंवा कथित हज घोटाळ्याबाबत मात्र गप्प का बसतात ? एका धार्मिक संस्थेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वच धर्मांतील कथित गैरप्रकाराबाबत समान भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी शिवसेना (उबाठा) गटावरही अप्रत्यक्ष टीका करत राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले. खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत मंत्री नितेश राणे म्हणाले, पूर्वी मातोश्रीत काड्या लावणारे आज भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायतीचा सरपंचदेखील होऊ शकत नाही, ते आज इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत.अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली.





