चंद्रशेखर बावनकुळे; उद्धव ठाकरेंनी पक्ष का फुटतोय याचे आत्मचिंतन करावे
मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटण्यामागे भाजपचा हात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले असून, 'ऑपरेशन टायगर'शी भाजपचा दूरान्वये संबंध नाही', असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय ते स्वतः घेतील आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा निर्णय घ्यावा. मात्र, ठाकरे यांचे लोक त्यांना का सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावे, असा खोचक टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.
मतदानाच्या तोंडावर नांदेडमध्ये नवा ट्विस्ट; काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपचे पारडे जड मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी ...
माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या विषयाशी भाजपचा संबंध नाही, त्यावर आमच्या नेत्यांनी बोलणे योग्य ठरणार नाही. या ऑपरेशनबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा आणि उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, असे बावनकुळे यांनी सांगितले.स्वतःचे लोक पक्ष सोडून का चालले आहेत, याचे उत्तर ठाकरेंनी शोधले पाहिजे. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षात नेमकी काय गडबड आहे, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. भाजप महायुतीचा घटक पक्ष म्हणून या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले.(Opration Tiger)






