मतदानाच्या तोंडावर नांदेडमध्ये नवा ट्विस्ट; काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपचे पारडे जड
मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ऐन मतदानाच्या तोंडावर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर 'ऑपरेशन टायगर'मध्ये सामील झाले. मात्र, काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या विरोधात आपल्या मुलाला रिंगणात उतरवून काँग्रेस व महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. मात्र, खा. आष्टीकर उबाठातून फुटून शिंदे गटाच्या गळाला लागल्यामुळे या निवडणुकीला 'नवा ट्विस्ट' मिळाला आहे. वडिलांच्या या बदललेल्या भूमिकेनंतर त्यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी घाईघाईने एक व्हिडीओ जारी केला. आपण अजूनही उबाठा गटात असल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. मात्र, या अंतर्गत गोंधळामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी विभागणी होणे आता अटळ मानले जात आहे.(Opration Tiger)
लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' पुलावर आज सकाळी भीषण साखळी अपघाताची ...
खा. आष्टीकर हे मंगळवारपर्यंत उबाठा पक्षात अत्यंत सक्रिय होते आणि त्यांनी तशी जाहीर भूमिकाही घेतली होती. मात्र, उबाठाच्या ६ खासदारांनी मिळून केलेल्या बंडात सहभागी होण्यासाठी आष्टीकर हे मंगळवारी रात्री हैदराबादमार्गे दिल्लीला रवाना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेड आणि हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे पुत्र कृष्णा पाटील हे या निवडणुकीत अपक्ष रिंगणात असले, तरी त्यांना उबाठा आणि काँग्रेसने संयुक्त पाठिंबा दिला होता. आता वडिलांनीच उबाठा गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.या राजकीय भूकंपामुळे निवडणुकीतील तिसरे उमेदवार म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काँग्रेसचे अनेक स्थानिक नगरसेवक सुरुवातीपासूनच आष्टीकर कुटुंबीयांच्या उमेदवारीच्या विरोधात होते. आता खा. आष्टीकर फुटीर गटात गेल्यामुळे काँग्रेसच्या नाराज नगरसेवकांनी आष्टीकरांच्या पुत्राला मतदान न करता वंचितच्या प्रशांत इंगोले यांना मतदान करावे, अशी उघड मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काहीही निर्णय घेतला, तरी येथील स्थानिक राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन रोखणे आता अशक्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबई: बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू ...
निवडणुकीचे गणित बदलले
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील या यादवीचा फायदा उठवण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपने या जागेवर माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या यंत्रणेने पहिल्या काही दिवसांतच रणनीती आखत बहुसंख्य मतदारांना अज्ञात स्थळी सहलीवर पाठवले होते. सहलीवर गेलेले हे सर्व नगरसेवक बुधवारी लातूर येथे एकत्र जमले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते खा. अशोक चव्हाण स्वतः बुधवारी सकाळीच लातूरला पोहोचून या गणितावर लक्ष ठेवून आहेत. मतदारसंघातील एकूण ४५२ मतदारांपैकी ३०० हून अधिक मतदारांची जुळवाजुळव भाजपने आधीच केली आहे. यात भाजपसह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीच्या सर्व नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने तर आपल्या सर्व नगरसेवकांवर 'व्हीप' (पक्षादेश) बजावून राजूरकर यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना केली आहे.



