नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीतील मालवीय नगर येथील एका गेस्ट हाऊसला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फरार असलेला हॉटेलचा मुख्य अकाउंटंट जय मिश्रा याने सोमवारी साकेत न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जय मिश्रा हा हॉटेलचे व्यवस्थापन, परवाने , ना-हरकत प्रमाणपत्र आणि कायदेशीर कागदपत्रांची कामे मॅनेजर राकेशसोबत मिळून पाहत होता. याप्रकरणी पोलिसांनी आधीच हॉटेल मालक लवकेश बजाज आणि कुक केशव नेगी यांना अटक केली आहे.
राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी २० ...
किचनमधील इलेक्ट्रिक शेगडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय आहे. आग लागल्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले, याचाही तपास सुरू आहे. गेस्ट हाऊसमध्ये सीलबंद खिडक्या, कुलूप लावलेले आपत्कालीन दरवाजे आणि अपुरी वायुविजन व्यवस्था असे अनेक नियमभंग आढळून आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ५० ते ६० मोबाईल आणि ३० पासपोर्ट जप्त केले आहेत. मृतांमध्ये मेडिकल व्हिसावर भारतात आलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे.सध्या पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि परवान्यांची कसून चौकशी करत आहेत.






