मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चित चित्रपट 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhhagya Viddhaata) १२ जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच (Trailer Launch) कार्यक्रमात कंगनाने मराठी कलाकार आणि मराठी रंगभूमीबद्दल विशेष भावना व्यक्त करत भरभरून कौतुक केले.
कंगना रणौत म्हणाली, “महाराष्ट्रात राहून मला २० वर्षे झाली आहेत. मात्र, मराठी कलाकारांसोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मला प्रथमच मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी खूप खास ठरला. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी किती समृद्ध आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.”
मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती मध्ये केली .: बॉलिवूडचा 'मिस्टर ...
या चित्रपटात कंगनासोबत मराठी अभिनेत्री गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते आणि ईशा डे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ट्रेलर लाँचदरम्यान (Trailer Launch) कंगनाने गिरीजा ओक (Girija Oak) आणि स्मिता तांबे (Smita Tambe) यांचे विशेष आभार मानले. ती म्हणाली, “पात्राचे उच्चार, बोलण्याची शैली आणि येथील जीवनशैली समजून घेण्यासाठी स्मिता आणि गिरीजा यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे आमच्यातील केमिस्ट्री अधिक नैसर्गिक आणि प्रभावी दिसून आली आहे.” कंगनाने पुढे सांगितले की, चित्रपटात महिला मैत्री, कुटुंबासाठीची बांधिलकी आणि देशाप्रती असलेली निष्ठा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. “प्रेक्षकांना या महिलांची ताकद, समर्पण आणि संघर्ष नक्कीच भावेल,” असेही ती म्हणाली.
View this post on Instagram
'भारत भाग्य विधाता'च्या ट्रेलरमध्ये कंगना एका परिचारिकेच्या भूमिकेत दिसत आहे. सुरुवातीला तिच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी ती धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर शेकडो लोकांचे प्राण वाचवते. एका सामान्य परिचारिकेचा असामान्य नायिकेमध्ये झालेला प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. खरे नायक स्वतःची जाहिरात करत नाहीत, तर गरज पडल्यावर पुढे येऊन आपले कर्तव्य बजावतात, हा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट १२ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





