Sunday, May 24, 2026

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान कोलकाताची फलंदाजी धुरा कर्णधार अजिंक्य रहाणे, फिन ऍलन, रिंकू सिंग, कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांच्यावर अवलंबून असेल, तर गोलंदाजीत सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले असले तरी ते कोलकात्याचे गणित बिघडवण्याची पूर्ण क्षमता ठेवतात. दिल्लीसाठी के. एल. राहुल कमालीच्या फॉर्ममध्ये असून त्याने या हंगामात चार अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. मात्र, इतर फलंदाज सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याने संघ अडचणीत आला आहे. मात्र आज डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, समीर रिझवी आणि साहिल पारेख यांना या सामन्यात जबाबदारीने खेळावे लागेल, तर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांच्यावर संघाची मदार असेल. या हंगामात अक्षर पटेल यांना अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे केकेआरचे प्लेऑफचे स्वप्न चक्काचूर करण्यात दिल्ली यशस्वी होईल का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >