मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची सोय करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई आणि गोरखपूर दरम्यान एक विशेष गाडी चालवणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावरील वातानुकूलित उपनगरी लोकल सेवांना मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९१५७ वांद्रे टर्मिनस – गोरखपूर विशेष गाडी रविवार, २४ मे २०२६ रोजी वांद्रे टर्मिनस येथून ००:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९१५८ गोरखपूर – बोरिवली विशेष गाडी सोमवार, २५ मे २०२६ रोजी गोरखपूर येथून २०:३० वाजता सुटेल आणि बुधवारी ११:३० वाजता बोरिवलीला पोहोचेल.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वे ...
गाडी क्रमांक ०९१५७/०९१५८ वांद्रे टर्मिनस–गोरखपूर–बोरिवली विशेष गाडी मार्गावर बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, नागदा, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, भरतपूर, मथुरा, हाथरस शहर, कासगंज, बरेली शहर, इज्जतनगर, पिलीभीत, मैलानी, सीतापूर, बुरहवाल, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक ०९१५७ च्या वाढीव फेऱ्यांसाठी बुकिंग सर्व पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू आहे. गाडीच्या थांब्यांच्या वेळा आणि रेकच्या रचनेबद्दल सविस्तर माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.



