Saturday, April 11, 2026

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका

मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याची चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवार यांनी, याच संप्रदायात शिरकाव केलेल्या 'अर्बन नक्षलवाद्यां'वरही कधीतरी बोलावे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी पवारांकडे काय योजना आहे आणि त्यांची संख्या किती, हे त्यांनी एकदा महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावे," असे आव्हान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना बन म्हणाले की, "वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा आणि भागवत धर्माची पताका उंचावणारा संप्रदाय आहे. या संप्रदायात धर्मांध शक्ती नाहीत. खरं तर औरंगजेब आणि अफजल खानाची वंशावळ हीच खरी धर्मांध शक्ती आहे. महाराष्ट्रात सध्या लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि लँड जिहादचे संकट उभे ठाकले असताना ज्येष्ठ नेते असूनही पवार यावर का बोलत नाहीत?"

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, "राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असे वाटत असल्यानेच वडेट्टीवार अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत आहेत. खरात याने केलेल्या कृत्याबद्दल कारवाई करण्याची हिंमत काँग्रेस सरकारमध्ये झाली नसती. राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, म्हणूनच तत्काळ कारवाई झाली," असा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत 'एआय'चा पहारा

मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाष्य करताना त्यांनी नालेसफाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. "महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही 'मुंबईकरांचे पहारेकरी' म्हणून काम करत आहोत. नालेसफाईतील घोटाळे रोखण्यासाठी आगामी काळात आवश्यक तिथे 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर महायुतीचा भर असेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >