Friday, April 10, 2026

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना सतरा कोटी आठ लाख नव्वद हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, विशेषतः नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. हातात आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार मकरंद पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला सतर्क करत नुकसानग्रस्त भागांचा सखोल आढावा घेण्याचे आदेश दिले आणि मदत प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासन यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आणि अल्पावधीतच मदत मंजूर होऊन शेतकऱ्यांना आधार मिळण्याचा मार्ग खुला झाला. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून संकटातून सावरण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे. बियाणे, शेतीची पुनर्बांधणी आणि पुढील हंगामासाठी आवश्यक असलेला खर्च भागवण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा