मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने गुरुवारी कायदेशीर दिलासा दिला. २००८ मधील बहुचर्चित रेल्वे नोकर भरती आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या कथित चिथावणीखोर भाषण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने पुराव्याअभावी राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला.
https://prahaar.in/2026/05/21/will-the-cockroach-janata-party-contest-the-elections-what-will-be-the-partys-next-political-move-abhijeet-dipke-told-eveything-genz-youth-political-movement-india/
२००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण स्थानकावर परप्रांतीय, विशेषतः उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते आणि या हिंसाचाराला राज ठाकरे यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांची पार्श्वभूमी असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते; तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती. या खटल्याच्या अंतिम सुनावणीच्या वेळी स्वतः राज ठाकरे न्यायालयात उपस्थित होते. मागील सुनावणीत त्यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदवताना, “या गुन्ह्याशी माझा कोणताही थेट संबंध नाही आणि आंदोलनाच्या वेळी मी नाशिक येथे होतो,” अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.
https://prahaar.in/2026/05/21/pahalgam-attack-mastermind-entire-operation-was-carried-out-from-pakistan-nia-makes-big-revelation/
सरकारी तपासावर बोट
https://prahaar.in/2026/05/21/modi-holds-urgent-meeting-after-returning-from-foreign-tour-big-decision-on-petrol-lpg/
अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी झाला