मुंबई : काल म्हणजेच गुरुवार ७ मे रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)चा नऊ धावांनी पराभव केला. इकाना स्टेडियमवर पावसामुळे प्रभावित झालेला हा सामना १९-१९ षटकांचा करण्यात आला होता. डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार आरसीबीसमोर २१३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, संघाला १९ षटकांत सहा गडी गमावून २०३ धावाच करता आल्या. लखनऊचा या हंगामातील ही तिसरी विजय ठरली, तर आरसीबीला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला.
https://prahaar.in/2026/05/08/good-news-for-rail-passengers-bengaluru-mumbai-superfast-train-likely-to-hit-tracks-by-june-end-vande-bharat-sleeper-may-follow-soon/
लखनऊकडून प्रिन्स यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकांत ३३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. शाहबाज अहमदने दोन विकेट्स मिळवल्या, तर मोहम्मद शमीला एक यश मिळाले.
https://prahaar.in/2026/05/08/stock-market-news-stock-markets-fall-sharply-in-early-trading-due-to-tensions-in-west-asia/
https://prahaar.in/2026/05/08/nashik-tcs-case-who-is-that-mim-corporator-who-hid-nida-khan-big-information-revealed/
अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार ऋषभ पंतने अवघ्या १० चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावा फटकावत संघाला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. पंतच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. आरसीबीकडून जोश हेजलवूड, क्रुणाल पंड्या आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.