Tuesday, May 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRain Updates : राज्यात पाऊस पुन्हा बरसणार पण १८ ऑगस्टनंतर; शेतकरी चिंतेत

Rain Updates : राज्यात पाऊस पुन्हा बरसणार पण १८ ऑगस्टनंतर; शेतकरी चिंतेत

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात मुसळधार

मुंबई : उशीरी आलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.

राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी ऊन वाढले आहे. काही ठिकाणी अपुरा पाऊस झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.

पावसाचे पुढच्या आठवड्यात पुनरागमन होणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ही स्थिती पुढील आणखी काही दिवस राहणार आहे. १८ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

राज्यात १८ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातील काही भागात होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.

मुंबईत देखील सामान्य पाऊसमान राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. सध्या मुंबईत पावसाची एखाद दुसरी सर होत असून पुढील सात दिवस हीच स्थिती राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -