Nitesh Rane : प्रकल्प नेला म्हणून बोंबलायचे अन् येणाऱ्याला विरोध करायचा

Share

देवगड (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्रात प्रकल्प येत नाहीत अशी बोंब मारायची आणि आलेल्या प्रकल्पांना विरोध करायचा ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नीती आहे’, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ‘प्रकल्प पळवतात म्हणून बोंब मारायची आणि केंद्राचे जे प्रकल्प आले आहेत त्याला विरोध करायचा अशी नीती येथील खा. विनायक राऊत यांची असून आदित्य ठाकरे यांनी विनायक राऊत यांना बैठकीला उपस्थित राहा असे सांगण्याची गरज होती असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र, आमदार राजन साळवी हे या बैठकीला उपस्थित राहिले व त्यांचे आपण स्वागत करतो असे ते म्हणाले.

आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देवगड येथे बारसू येथील रिफायनरीबाबत देवगड तालुक्याला होणारा फायदा याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. माजी आ. अजित गोगटे, भाजप पदाधिकारी बाळ खडपे, प्रकाश राणे, संदीप साटम, योगेश पाटकर, दयानंद पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘बारसू रिफायनरी जरी रत्नागिरी जिल्ह्यात होणार असली तरी ड्राय पोर्ट तसेच इतर अनेक प्रकल्प हे गरजेचे असतात. त्यासाठी देवगड तालुक्याचा प्राधान्याने विचार होणार आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे बारसू रिफायनरीच्या विकासाचा लाभ रोजगार व इतर दृष्टीने देवगडलाही मिळणार आहे हे निश्चित आहे. याबाबत देवगडवासीयांनी आपल्या मनात कोणताही किंतू बाळगू नये’, अशी माहितीही आ. नितेश राणे यांनी दिली. यासाठी आवश्यक पाठपुरावा आपण करणार असून देवगड तालुक्यातील ज्या जागा आहेत त्या जागांवर प्रकल्पाला आवश्यक असलेल्या गोष्टी उभ्या राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दिशा सालियन प्रकरणी आपला संशय कायम…

पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला. घटना घडली त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होते. त्यामुळे त्यांनी पुरावे अशा प्रकारे नष्ट केले असले पाहिजेत की ते मिळूच नयेत. खरे म्हणजे पुरावे कसे नष्ट करावे याचे ट्रेनिंग त्यांच्याकडूनच घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सीबीआयला नेमके काय सापडले? त्यांनी शवविच्छेदन अहवाल पाहिला का? त्यामध्ये काय लिहिले आहे, याची सविस्तर माहिती घ्यावी लागेल. दिशा प्रकरणात अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीत हे लक्षात घेता यामध्ये दिशा सालीयन हिच्या हत्येचा संशय कायम आहे आणि आपण या मतावर ठाम आहोत, असेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.

मग, आदित्य ठाकरे हिंदुत्ववादी कसे?

आदित्य ठाकरे हे बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पुत्रांची भेट घेतात. याबाबत बोलताना आ. नितेश राणे म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांनी राम जन्मभूमी संदर्भातील निघालेल्या रथयात्रेला विरोध केला होता. त्यांच्याच पुत्राला आदित्य ठाकरे भेटायला जात असतील, तर प्रखर व हिंदुत्ववादी असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नातू हिंदुत्ववादी कसे म्हणून घेतात? याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे असेही म्हणाले.

संबंधित बातम्या…

दिशा सालियन प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी

वेदांता जाण्यास वसुली धोरण कारणीभूत : नितेश राणे

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची आमदार नितेश राणे यांनी उडवली खिल्ली

दिशा सालियनच्या पार्टीत आदित्य ठाकरेंची उपस्थिती, अभिनेत्री नुपूर मेहता यांचा धक्कादायक खुलासा

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

5 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

8 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

9 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

9 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

10 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

11 hours ago