Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडी१२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; उद्धव ठाकरेंना धक्का

१२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; उद्धव ठाकरेंना धक्का

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठविलेली १२ नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे. राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने नवीन १२ सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल, अशी माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -