नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी INDIA आघाडीत फूट (INDIA alliance split) पडली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. यामुळे विरोधी पक्ष इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे.
ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी INDIA आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.