जम्मू-काश्मीरात सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु : आठवले

Share

जम्मू (हिं.स) : केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवे असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी दिली. जम्मूच्या संमेलन केंद्रात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२०१९ साली केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर, या भागात विकासाची कवाडे खुली झाली आहेत. याचा प्रत्यय आपल्याला यातूनच येतो की, आता येथे केंद्राच्या सर्व योजना, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु झाली आहे.

अनेक केंद्रीय योजनांची इथे १०० टक्के अंमलबजावणी सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या लोकांना, सर्व आघाड्यांवर मग ते स्वतःचे घरकूल असो, उपजीविका असो, या सगळ्या सुखसुविधा देण्यास सरकार पूर्ण कटिबद्ध असल्याचाच हा पुरावा आहे. सरकारला येथे सामाजिक स्थैर्य निर्माण करायचे आहे.

या दौऱ्यात रामदास आठवले यांनी जम्मू आणि काश्मीरमधील समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह, समाज कल्याण योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीला, समाज कल्याण विभाग, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक विवेक शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Recent Posts

स्वप्न…

माेरपीस: पूजा काळे आपल्या जीवनाला अनेक गोष्टी अर्थ आणत असतात. सुंदर, भव्य स्वप्नांचा अंतर्भाव त्यात…

14 mins ago

व्यावसायिकांना स्वयंपूर्ण करणारी सोशल आंत्रप्रेनिअर

दी लेडी बॉस:अर्चना सोंडे लहानपणी मधमाशांचे मोहोळ पाहिले होते. आपण खातो तो मध तयार करण्यासाठी…

29 mins ago

मराठीच्या मुद्द्यांकरिता लढणार कोण?

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मराठी शाळांबाबत एकूण समाज अधिकाधिक असंवेदनशील होत चालला आहे, असे मला…

43 mins ago

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात विविध राज्यांत मतदान चालू आहे. ४ जून…

57 mins ago

RCB vs GT: डुप्लेसीचं अर्धशतक गुजराजसाठी ठरलं घातक, बंगळुरुचा दमदार विजय…

RCB vs GT: बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा…

2 hours ago

नारायण राणेंना ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची मिळाली असती तर…राज ठाकरेंकडून कौतुक

कणकवली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज…

2 hours ago