मुंबई: मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघात(accident) झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर बरेच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास राहूड घाटात एसटी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
सकाळी झालेल्या या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तर पोलिस घटनास्थळी पोहचले. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.