इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बंगळुरू येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. के. कस्तुरीरंगन यांनी सकाळी १०.४३ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जनतेला अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

के. कस्तुरीरंगन हे नऊ वर्षे इस्रोचे प्रमुख होते. या कार्यकाळात त्यांनी इस्रो, अंतराळ आयोग आणि अंतराळ विभागाचे नेतृत्व केले. ते २७ ऑगस्ट २००३ रोजी निवृत्त झाले. के. कस्तुरीरंगन यांच्या कार्यकाळात पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॉकेटच्या विकास कार्यक्रमांनी वेग घेतला.

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पर्यावरणाच्या रक्षणासाठी के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आली. नंतर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. दोन्ही समित्यांनी पश्चिम घाटावर खाणकाम आणि सर्व प्रकारच्या उत्खननावर बंदी घालण्याची शिफारस केरळ आणि कर्नाटक सरकारला केली होती. दोन्ही राज्यांमध्ये या शिफारशींना स्थानिक पातळीवरुन विरोध झाला. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षेखाली स्थापन केलेल्या समितीने फक्त एकाच पिकाची शेती करण्याऐवजी एका वर्षात एक पेक्षा जास्त पिकांची शेती एकाच शेत जमिनीवर करण्याचीही शिफारस केली होती. विशेष म्हणजे अशीच शिफारस माधव गाडगीळ समितीनेही केली होती. पण के. कस्तुरीरंगन आणि माधव गाडगीळ यांच्या शिफारशी राजकीय कारणांमुळे पुढे बासनात गुंडाळण्यात आल्या.

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

भारताची रिमोट सेन्सिंग क्षमता विकसित करण्यात के. कस्तुरीरंगन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भास्कर I आणि II उपग्रहांसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले. पृथ्वीची अंतराळातून पाहणी करणे आणि पृथ्वीवरील तांत्रिक कामांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मोठा कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात सुरू झाला. इन्सॅट – २, आयआरएस १ अ आणि १ ब हे महत्त्वाचे उपग्रह त्यांच्या कार्यकाळात प्रक्षेपित करण्यात आले.

भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी शालेय आणि उच्च शिक्षणात व्यापक सुधारणा प्रस्तावित करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषवले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती, कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष, नियोजन आयोगाचे सदस्य आणि २००३ ते २००९ याकाळात राज्यसभेचे मानद सदस्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी सरकारने त्यांना वेगवेगळ्या वर्षात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविले आहे.

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीचा सेवा कालावधीत एका तासाने कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सकाळचा सेवा कालावधी एका तासाने तर रात्रीचा सेवा कालावधी एका तासाने कमी करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी या मार्गिकेवरील सेवा सकाळी ६.३० ते रात्री ९.३० दरम्यान सुरू राहणार आहे, तर शनिवारी सकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत सेवा सुरू राहणार आहे. (Mumbai news)

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानच्या टप्पा २ अ चे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गिकेवर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सीएमआरएसकडून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास टप्पा २ अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. येत्या दोन-तीन दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अानुषंगाने सीएमआरएसच्या चाचण्यांसाठी शुक्रवारी, शनिवारी एमएमआरसीने आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल केला आहे. आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो गाड्यांची आणि इतर यंत्रणांची, प्रणालींची चाचणी करण्यासाठी शुक्रवार, शनिवारी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mumbai Metro 3)

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरे ते बीकेसी मार्गिकेवरील सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. रात्रीच्या वेळेस एका तासाने सेवा कालावधी कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. शनिवारी सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी करण्यात आला आहे. तेव्हा प्रवाशांनी याची नोंद घेत या वेळेत प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा असे आवाहन एमएमआरसीकडून केले आहे.

मूळ वेळापत्रक

सोमवार ते शनिवार -सकाळी ६.३० ते १०.३०रविवार-सकाळी ८.३० ते १०.३०

वेळापत्रकातील बदल असा

शुक्रवार -सकाळी ६.३० ते ९.३० ( सेवा कालावधी एका तासाने कमी)

शनिवार-सकाळी ७.३० ते रात्री ९.३० (सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी)रविवारच्या वेळापत्रकात सध्या तरी कोणताही बदल नाही.

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन कुणाल कामरा याची मुंबई पोलीस चौकशी करू शकतात. पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार सध्या दूर झाल्याचे चित्र आहे. न्यायालयाकडून कुणाल कामराला हा दिलासा मिळाला आहे.

World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

स्टँड-अप कॉमेडी शो करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची कुणाल कामराची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा प्रकरणाशी संबंधित सुनावणी सुरू राहणार आहे.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

कुणाल कामरा सध्या चेन्नईच्या घरी वास्तव्यास आहे. यामुळे पोलिसांना चौकशी करायची असेल तर चेन्नईत जाऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करावी लागणार आहे.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात (Elphinstone Bridge Closed) येणार आहे. वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असल्याची माहीती दिली आहे.

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

एमएमआरडीएने (MMRDA) या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्याची शुक्रवार, २५ एप्रिल रोजी रात्री ९ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले.

प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल आज शुक्रवार (दि.२५) रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. १२५ वर्षे जुन्या या पुलाचे पाडकाम करून त्या जागी एमएमआरडीए नवा डबलडेकर पूल उभारणार आहे. हे काम पुढील दोन वर्षे चालणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे या भागात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा मात्र विरोध आहे. आधी १० एप्रिलला पूल बंद होणार अशी माहिती समोर आली होती. पण पूल पाडण्याआधी हरकती आणि सूचना प्रशासनाने मागवल्या होत्या. त्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची वेळ देण्यात आली होती. आता प्रशासनाकडून पुलाच्या पाडकामावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शुकवारपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यात याच्या पाडकामाला सुरुवात केली जाईल.

काय असतील पर्यायी मार्ग?

एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. करी रोड पुलावरील वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. करी रोड पुलावरून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभादेवी आणि लोअरपरळच्या दिशेने अशी एकेरी वाहतूक सुरू राहील, तर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत टाटा आणि केईएम रुग्णालयाच्या दिशेनं एकेरी वाहतुकीसाठी खुला राहिल.

त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूल दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी खुला असणार आहे. करी रोड पुलावरील या बदलासोबतच पर्यायी मार्ग म्हणून दादरचा टिळक ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिजचा पर्याय उपलब्ध आहे. असं असलं तरी एल्फिन्स्टन ब्रिजवरील दररोजची रहदारी पाहता येथील वाहतुकीचा भार इतर पुलांवर येणार असल्यानं मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते.

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र अतिरेकी आले कुठुन आणि कसे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुरक्षा पथकांनी आतापर्यंत तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅली येथे भोवताली लहान मोठ्या टेकड्या आहेत. मागे काही किलोमीटर अंतरावर पर्वत आहेत. या भागात टेकडीत काही ठिकाणी गुहा आहेत. या गुहांपैकी एखाद्या गुहेत अतिरेकी लपले होते. या अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळाली. यामुळेच अतिरेकी दीर्घ काळ शस्त्रांचे आणि स्वतःचे अस्तित्व लपवून पर्यटकांची वाट बघत लपून राहू शकले. ही बाब लक्षात येताच जम्मू काश्मीर पोलिसांनी १५०० पेक्षा जास्त संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

टेकड्यांमध्ये अनेक नैसर्गिक आणि निवडक मानव निर्मित गुहा आहेत. या गुहांमध्ये लपून राहणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर अन्न – पाणी, औषधे, शस्त्रे, कपडे अशा स्वरुपाची मदत मिळाल्यास गुहेत दीर्घकाळ लपणे आणि थेट कारवाईच्यावेळी बाहेर येणे शक्य आहे. अतिरेक्यांनी स्थानिक पातळीवरील पैशांसाठी फितूर झालेल्यांची मदत घेऊनच पहलगाम हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

फितूर शोधण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, स्थानिक खबरी नेटवर्क यांची मदत सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. संशयितांच्या आर्थिक व्यवहारांची आणि फोन रेकॉर्डची तपासणी केली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांच्या कलाकाराने रेखाचित्र काढली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेली माहिती आणि पोलीस चौकशीतून हाती आलेली माहिती याची पडताळणी करुन पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्र त्यांच्या नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केली आहेत. ही तीन रेखाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी आणखी काही अतिरेकी स्थानिक मदतनीस म्हणून सहभागी झाले होते. यात त्राल येथील आसिफ शेख हा एक अतिरेकी होता.

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

सुरक्षा पथकांना आदिल आणि आसिफ शेख या दोघांची घरे जम्मू काश्मीरमध्येच असल्याचे कळले. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकांनी या घरांवर धाड टाकली. एका अतिरेक्याच्या घरात आयईडी आढळला. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने आयईडी न हलवता तिथेच स्फोट करुन नष्ट करणे हाच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन स्फोट करण्यात आला. अतिरेक्याचे घर आयईडी स्फोटात नष्ट झाले. यानंतर दुसऱ्या अतिरेक्याच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर पाडण्यात आले. दोन्ही घरे नष्ट झाली आहेत. पण अद्याप अतिरेकी सापडलेले नाहीत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. आदिलचे बिजबेहारातील गुरी येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले. तसेच अतिरेकी आसिफ शेखचे घर स्फोटकांनी नष्ट करण्यात आले.

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला पहिले मोठे यश मिळाले आहे.

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर शुक्रवार २५ एप्रिल रोजी भारतीय सुरक्षा पथकाने बांदीपोरात लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले.

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दुडू बसंतगड परिसरात सहाव्या पॅरा एसएफचे हवालदार झंटू अली शेख गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलामी दिली आहे. जीओसी आणि व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सर्व रँकनी त्यांचे धाडस आणि शौर्य याचे सन्मानाने स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतींन उजाळा दिला.

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांनी अतिरेक्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शोधून ठार केले जात आहे. मागील दोन महिन्यात अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या अकरा चकमकींमध्ये एकूण सहा जवान हुतात्मा झाले आहेत. सुरक्षा पथकांची अतिरेक्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे.

Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम

बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी क्लासिक (NC Classic) भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने सोमवारी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आमंत्रण दिले होते. पण मंगळवार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्यांना ठार करण्यात आले. तब्बल २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाला धक्का बसला. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू झाली आणि नीरज चोप्राचे सोमवारी दिलेले आमंत्रण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

पाकिस्तानच्या भालाफेकपटूला भारतातील स्पर्धेसाठी विशेष आमंत्रण दिल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका सुरू झाली. अखेर नीरजने ट्वीट करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

मी मितभाषी आहे. पण चुकीचं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध बोलतो. माझ्या देशप्रेम आणि निष्ठेविषयी कोणी शंका उपस्थित करत असेल अथवा प्रश्न विचारत असेल तर मला बोलावंच लागेल. नाहक माझ्याविषयी अथवा माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामी करणारी वक्तव्य होत असतील तर ती खोडून काढावीच लागतील.

ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताकडून मी सहभागी झालो. आमच्या कामगिरीनंतर दोघांच्या आयांची एकमेकींशी भेट झाली, त्यावेळी अनेकांनी या क्षणांचे विशेष कौतुक केले. आज अर्शदला एका स्पर्धेसाठी भारतात आमंत्रित केले तर थेट माझ्या आणि माझ्या आईच्या देशप्रेमावरच शंका उपस्थित केली जात आहे. हे खूप जास्त होत आहे.

अर्शदला आमंत्रण दिले ते एक खेळाडू म्हणून. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला अशा स्वरुपाचे हे आमंत्रण होते. हे आमंत्रण सोमवारी २१ एप्रिल रोजी दिले होते. जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती. पण मंगळवारी पहलगाममध्ये जे घडले त्यानंतर अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उरलेला नाही. देश, देशप्रेम, देशाविषयीची निष्ठा हे कधीही सर्वोच्चच असेल, असे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला.

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

मला विश्वास आहे की आपल्या देशाचा प्रतिसाद एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवेल आणि न्याय मिळेल…” ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि न्याय मिळेल, असे नीरजने ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

त्याने पुढे लिहिलं, ‘मी अभिमानाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेंव्हा माझ्या देशप्रेमावर शंका उपस्थित होते, तेव्हा ती वेदना एकदम खोलवर पोहोचते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. आम्ही साधे आणि शांत लोक आहोत. माझ्याविषयी काही माध्यमांनी बनवलेल्या खोट्या बातम्या मी खोडून काढत नाही, याचा अर्थ त्या सत्य आहेत, असं नाही.

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्या पर्यटकांना ठार करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीआधारे तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. या तीन अतिरेक्यांना सुरक्षा पथके शोधत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करुन माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती सुरक्षा पथकांना मिळाली. यानंतर सुरक्षा पथकांनी तातडीने कारवाई केली.

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

भारतीय वायुसेनेने सुरू केला युद्धाभ्यास

जरी तीन रेखाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी आणखी काही अतिरेकी स्थानिक मदतनीस म्हणून सहभागी झाले होते. यात त्राल येथील आसिफ शेख हा एक अतिरेकी होता.

सुरक्षा पथकांना आदिल आणि आसिफ शेख या दोघांची घरे जम्मू काश्मीरमध्येच असल्याचे कळले. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकांनी या घरांवर धाड टाकली. एका अतिरेक्याच्या घरात आयईडी आढळला. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने आयईडी न हलवता तिथेच स्फोट करुन नष्ट करणे हाच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन स्फोट करण्यात आला. अतिरेक्याचे घर आयईडी स्फोटात नष्ट झाले. यानंतर दुसऱ्या अतिरेक्याच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर पाडण्यात आले. दोन्ही घरे नष्ट झाली आहेत. पण अद्याप अतिरेकी सापडलेले नाहीत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.

आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. यातील आदिलचे बिजबेहारातील गुरी येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले. तसेच अतिरेकी आसिफ शेखचे घर स्फोटकांनी नष्ट करण्यात आले.

World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे. पण, मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होतो, हा शोध नेमका लागला कसा? चला जाणून घेऊया या लेखातून…

मलेरिया खरंतर जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून माणसाला होतोय.. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीक वैद्य हिपोक्रेटस यानेही मलेरियासारख्या आजाराची नोंद केलेली आढळते. पण, हा आजार डासांपासून होतो, हे शोधण्याचं श्रेय मात्र, डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटीश माणसाला जातं.

सन १८९८मध्ये त्यांनी हा शोध लावला. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. अॅनोफिलिस या प्रजातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास प्लाझमोडियम सारख्या परजीवी जंतूचा प्रसार करतो. या जंतुची अंडी आधी डासाच्या पोटात तयार होतात, मग ती डास चावल्यानंतर त्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरात जातात, हे रॉस यांनी शोधून काढलं.

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणं दिसतात. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण कोमात जाऊन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेचं डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करणं, तिथे वेळोवेळी औषध फवारणी करणं गरजेचं असतं.