नवी दिल्ली : सियालदह एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारची आहे. गोळीबारानंतर या त्याव्यक्तीला रेल्वेतून उतरवून अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
गोळीबार करताना ही व्यक्ती नशेत तर नव्हती ना याचा शोध पोलीस घेत आहेत.यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेदरम्यान सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या वकीलाने सांगितले की अचानक घडलेल्या या घटनेने सारेच प्रवासी प्रचंड घाबरले. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली जावी अशी त्यांची इच्छा होती.
अशाच पद्धतीचे प्रकरण जुलैमध्येही समोर आले होते. तेव्हा पालघर स्टेशनजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलातील माजी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना आणि रेल्वेतील तीन अन्य प्रवाशांची गोळी घालून हत्या केली होती.
या प्रकरणी चौधरीवर या गुन्ह्या वापरल्या गेलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात हत्या आणि अपहरणाची केसही दाखल करण्यात आली होती. याशिवाय चौधरीवर धर्माच्या आधारावर गटादरम्यान विरोध भडकावण्याचा आरोपही करण्यात आला होता.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४च्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. देशभरात सोमवारी म्हणजेच…
मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण…
RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…
महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…
मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…
मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…