अहमदाबाद: आस्ट्रेलिया(australia) आणि अफगाणिस्तानला(afganistan) विश्वचषकात हरवल्यानंतर टीम इंडियाचा १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.
भारतीय संघाने विश्वचषकातील पहिले दोनही सामने जिंकले आहेत त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र अद्यापही संघात काही कमतरता आहेत. या कमतरता दूर झाल्या तर टीम इंडियाचे विजयी अभियान असेच सुरू राहू शकते आणि वर्ल्डकपचा दावेदारही संघ बनू शकतो.
सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाला काही बाबतीत सुधारण्याची गरज आहे. जर सुरूवातीला इशान किशनबाबत बोलायचे झाल्यास दिल्ली येथील सामन्यात त्याने ४७ धावा केल्या. मात्र त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वासाठी कमतरता जाणवली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खूपच गैरजबाबदार दिसला.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ३९ धावा देत ४ विकेट मिळवल्या होत्या मात्र गोलंदाजीत दुसरीकडे त्याचा पार्टनर मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली. त्याने आपल्या ९ ओव्हरमध्ये ७६ धावा दिल्या होत्या. अशातच मोहम्मद शमीला सिराजच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…