DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा फलंदाज फ्रेजर-मैक्गर्कने फक्त २८ चेंडूत ८४ धावा करत पावरप्लेमध्येच संघाची धावसंख्या शंभरापार लावली. त्यानंतर आलेल्या शाय होपने १७ चेंडूत ४१ धावा तर स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावा करत संघाची आक्रमक खेळी सुरुच ठेवली. दिल्लीने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. आणि मुंबईसाठी 258 धावांचं आव्हान दिले.
दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. ईशान आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती. परंतु, रोहितला खलील अहमदलने बाद केले. चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शाय होपकडे झेल देत बाद झाला. रोहितने ८ चेंडूत ८ धावा केल्या.
पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारने ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशानने मुकेशविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा झेल अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे ईशानला १४ चेंडूत २० धावा करून माघारी परतावे लागले. सूर्यकुमारने ३ चौकार आणि २ षटकार मारत आक्रमकता दाखवली, पण ६ व्या षटकात खलील अहमदने त्याला परत पाठवले.
अखेरच्या षटकात मुंबईला २५ धावांची गरज होती. सर्वांच्या नजरा तिलक वर्मावर खिळल्या. पण दोन धावांसाठी धावताना पंतने त्याला धावबाद केले. तिलकने ६३ धावा केल्या. त्यातच अखेरच्या चेंडूवर पीयुष चावला शाय होपकडे झेल देत 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 247 धावांवर संपला. त्यामुळे हा सामना दिल्लीने 10 धावांनी जिंकला.
दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध; साधक निर्दोष मुक्त! पुणे : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी…
संशोधकांच्या उंचावल्या भुवया; जाणून घ्या सविस्तर माहिती मेक्सिको : जगभरात विविध घडामोडी घडत असताना संशोधक…
व्हिडीओ होतोय व्हायरल; नेमकं प्रकरण काय? जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती पालघर : कणकवली, देवगड,…
दोन बाईकस्वार, दोन जोडपी, रिक्षावाला आणि मग शिक्षक; बाळाची सुटका करण्यासाठी पोलिसांचा थरार का केलं…
'या' दिवशी दहावी व बारावीचे निकाल होणार जाहीर पुणे : वाढत्या महागाईमुळे बोर्डाने दहावी बारावी…