छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्या रक्ताचा

Share

निलेश राणे यांचे भावोद्गार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी रक्ताचा आहे. आम्ही शिवप्रेमी आहोत, महाराज हेच आमचं जग आहे. देवाच्या स्थानी आम्ही महाराजांना बघतो. त्यांचे संस्कार आमच्या रक्तात आहेत. मुघलांसारखे एवढं मोठं संकट अंगावर असताना महाराज उभे ठाकले. तीच ऊर्जा आमच्यात येते त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो समोर विरोधक कितीही मोठा असो त्याला अंगावर घेण्याची ताकद आमच्यात असते, असे भावोद्गार भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या शिवउद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे ही सावंतवाडीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. या पुढील पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा. ते कसे जगले असतील? कसे लढले असतील? यापासून प्रेरणा घेऊन पुढील पिढी आदर्श घडावी यासाठी महाराजांचा हा पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होते हे देखील माझे भाग्यच आहे. मला मनापासून जे कार्यक्रम आवडतात त्यापैकी हा एक सोहळा असून मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, न.प. गटनेते राजू बेग, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा समिती सभापती उदय नाईक, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान उपस्थित होते.

‘संजू परब महाराजांचे संस्कार विसरले नाहीत’

संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय. मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं, प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी हे काम करत असताना नेहमीच राजकारण बाजूला ठेवलं. माझ्या शहराला जी गरज आहे त्यात राजकारण येता कामा नये हे त्यांनी नेहमी पाहिलं. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम करत असताना संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधीही विसरले नाहीत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला.

Recent Posts

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…

4 mins ago

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

41 mins ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

45 mins ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

1 hour ago

MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय? मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

1 hour ago

Bhupendra Jogi : ‘नाम? भूपेंदर जोगी!’ या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्रवर हल्ला!

पाठीला आणि हाताला ४० टाके भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.…

2 hours ago